श्लोक ३११ ते ३२०

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

देशाटनं राजसभाप्रवेशो
व्यापारिविद्वज्जनसङ्गतिश्च।
सर्वेषु शास्त्रेष्ववलोकनं च
चातुर्यमूलानि भवन्ति पञ्च।।३११।।

देशाटन (प्रवास करणे), राजसभेत प्रवेश (मोठ्या लोकांच्या किंवा प्रशासकीय वातावरणात मिसळणे), व्यापारी आणि विद्वान लोकांची संगत, आणि सर्व शास्त्रांचे अध्ययन करणे — हे पाच गुण माणसाला 'चातुर्य' (व्यवहारकुशलता) शिकवतात.

Traveling to different lands, interacting with people in high-level assemblies (or governance), associating with merchants and learned scholars, and studying various scriptures—these are the five foundations that develop wisdom and worldly intelligence.

आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम्।
एतान्प्रपश्यसि घटाञ्जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः।।३१२।।

अरे धनाच्या अहंकारात आंधळ्या झालेल्या मूर्खा, संकटात पडलेल्या व्यक्तीला पाहून तू का हसतोस? लक्ष्मी (संपत्ती) स्थिर नसते, यात नवल ते काय? रहाटावरील घागरींकडे पाहतोस ना? ज्या भरलेल्या आहेत त्या रिकाम्या होतात आणि ज्या रिकाम्या आहेत त्या भरल्या जातात; हेच जगाचे चक्र आहे.

O foolish person blinded by wealth, why do you laugh at one who has fallen into misfortune? Is it any wonder that wealth is not permanent? Just look at the pots on a water-lifting wheel (persian wheel)—those that are full become empty, and those that are empty become full. Such is the nature of life.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पाणी पुरतो मा ब्रूहि दीनं वचः।।३१३।।

अरे चातक मित्रा, माझे म्हणणे सावधान मनाने क्षणभर ऐक. आकाशात ढग तर खूप आहेत, पण ते सर्व एकासारखे नसतात. काही ढग पावसाने पृथ्वीला ओले करतात (परोपकारी असतात), तर काही ढग उगाचच गर्जना करतात (व्यर्थ बडबड करतात). त्यामुळे, आकाशात दिसणाऱ्या प्रत्येक ढगासमोर जाऊन तुझे दीनवाणे (याचना करणारे) शब्द नको बोलू.

येथे 'चातक' म्हणजे स्वाभिमानी पण गरजू व्यक्ती आणि 'मेघ' म्हणजे धनवान किंवा सामर्थ्यवान लोक.
कवी सांगतो की, समाजात अनेक श्रीमंत लोक असतात, पण त्यातील सर्वच दानशूर नसतात. काही लोक फक्त स्वतःच्या संपत्तीचे प्रदर्शन (गर्जना) करतात, पण कोणालाही मदत करत नाहीत. म्हणून, एका स्वाभिमानी व्यक्तीने आपल्या गरजेसाठी प्रत्येकापुढे हात पसरू नये, तर केवळ खरोखर उदार असलेल्या व्यक्तीचीच साथ शोधावी. आत्मसन्मान गमावून कोणाकडेही याचना करणे चुकीचे आहे.

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं
चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम्।
अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात्
चित्तप्रसादे प्रथमं यतस्व।।३१४।।

जर तुमचे चित्त (मन) प्रसन्न असेल, तर संपूर्ण जग तुम्हाला प्रसन्न वाटते; आणि जर मन उदास असेल, तर जगही तुम्हाला दुःखद वाटते. म्हणून, जर तुम्हाला जीवनात खऱ्या सुखाची इच्छा असेल, तर सर्वात आधी आपले मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

If your mind is cheerful, the world appears cheerful; if your mind is depressed, the world appears gloomy. Therefore, if you desire happiness in life, strive first to keep your mind tranquil and pleasant.

चित्ताक्रान्तं धातुबन्धं शरीरं
चित्ते नष्टे धातवो यान्ति नाशम्।
तस्माच्चितं सर्वतो रक्षणीयं
स्वस्थे चित्ते बुद्धयः सम्भवन्ति।।३१५।।

आपले शरीर हे मन (चित्त) आणि धातूंच्या बंधनाने बनलेले आहे. जर मनच नष्ट झाले किंवा विचलित झाले, तर शरीरातील धातूही (जीवनशक्ती/संतुलन) नष्ट होतात. म्हणूनच, मनाचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. कारण जर मन स्वस्थ असेल, तरच बुद्धी कार्यक्षम आणि स्थिर राहू शकते.

The body is a structure held together by the mind and the vital elements (dhatus). When the mind is ruined or disturbed, the vital elements also perish. Therefore, one must protect the mind from all directions, for it is only when the mind is healthy that wisdom and intelligence truly flourish.

यदा किञ्चिज्ज्ञोऽहं द्विप इव मदान्धः समभवं
तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः।
यदा किञ्चित्किञ्चिद्बुधजनसकाशादवगतं
तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः।।३१६।।

जेव्हा मला थोडे ज्ञान मिळाले होते, तेव्हा मी मदाने अंध झालेल्या हत्तीप्रमाणे अहंकारी झालो होतो आणि 'मला सर्व काही कळते' असे मानून माझे मन गर्वाने फुगले होते. परंतु, जेव्हा मी हळूहळू विद्वान लोकांच्या सहवासात गेलो आणि काही ज्ञान प्राप्त केले, तेव्हा मला समजले की मी तर मूर्ख आहे. हे समजताच माझा तो गर्व (जो तापासारखा होता) पूर्णपणे निघून गेला.

When I knew only a little, I became blind with pride like an elephant in rut, and my mind was puffed up with the thought that "I am omniscient." But when I learned a little more in the company of the wise, I realized that I was actually a fool. As soon as I realized this, my pride vanished like a fever.

न विद्यया न कुलेन गौरवं
जनानुरागो धनिकेषु सर्वदा।
कपालिना मौलिधृताऽपि जाह्नवी
प्रयाति रत्नाकरमेव सर्वदा।।३१७।।

समाजात मान-सन्मान केवळ विद्या किंवा उच्च कुळामुळे मिळत नाही, तर लोकांचा ओढा (प्रेम/आदर) नेहमी धनवानांकडेच असतो. ज्याप्रमाणे भगवान शिवाने मस्तकावर धारण केलेली असूनही (सर्वोच्च सन्मानाचे स्थान दिलेले असूनही) पवित्र गंगा सुद्धा शेवटी सागरालाच जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्वजण श्रीमंतांकडेच धावतात.

Respect is not gained by knowledge or by noble birth alone; the affection of the people always leans towards the wealthy. Even the sacred river Ganga, despite being held on the head (given the highest honour or status) by Lord Shiva, ultimately flows only towards Ratnakara (meaning the ocean which is the repostory of precious gems)

यथा खरश्चन्दनभारवाही
भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य।
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य
अर्थेषु मूढाः खरवद्वहन्ति।।३१८।।

ज्याप्रमाणे गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे लादले, तर त्याला केवळ 'ओझ्याचे' (भार) ज्ञान असते, 'चंदनाच्या' सुगंधाचे किंवा मूल्याचे नाही; त्याचप्रमाणे, अनेक शास्त्रे वाचूनही ज्यांना त्यांच्यातील अर्थ किंवा उपयोगाचे ज्ञान होत नाही, ते लोक त्या गाढवाप्रमाणेच फक्त ज्ञानाचे ओझे वाहतात.

Just as a donkey carrying a load of sandalwood knows only the weight, not the fragrance or value of the sandalwood; similarly, those who have studied many scriptures but are ignorant of their true purpose/application, continue to carry the burden (of knowledge) just like a donkey.

भवन्ति नम्रास्तरवः फलागमैः
नवाम्बुभिर्भूरि विलम्बिनो घनाः।
अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः
स्वभाव एवैष परोपकारिणाम्।।३१९।।

फळांनी लगडलेली झाडे नम्र होतात, पाण्याने भरलेले ढग जमिनीच्या जवळ (खाली) येतात, आणि संपत्ती प्राप्त झाल्यावर सज्जन माणसे अधिक नम्र होतात. परोपकारी लोकांचा हा स्वभावच असतो.

Trees bend low when they are laden with fruits; clouds hang low when they are heavy with new water; similarly, virtuous people become humble when they attain prosperity. This is the very nature of those who live to help others.

साहित्यसङ्गीतकलाविहीनः
साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।
तृणं न खादन्नपि जीवमानः
तद्भागधेयं परमं पशूनाम्।।३२०।।

ज्याच्याकडे साहित्य, संगीत आणि कलेचा गंध नाही, तो माणूस म्हणजे शेपटी आणि शिंगे नसलेला 'साक्षात प्राणी' आहे. तो गवत न खाताही जगतो, हे प्राण्यांचे मोठे नशीबच म्हंटले पाहिजे!  (कारण जर तो गवत खाऊ लागला, तर प्राण्यांच्या वाट्याचे गवत कमी पडेल).

A person who lacks interest in literature, music, and the arts is, in reality, a beast without a tail and horns. The fact that he remains alive without eating grass is the great fortune of the animals! (Otherwise the animals may suffer from the lack of grass to eat)