श्लोक ३५१ ते ३६०

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः
सत्यं चेत्तपसा च किं शुचि मनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणैः सुमहिमा यद्यस्ति किं मण्डनैः
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना।। ३५१।।

जर अंगी लोभ असेल तर इतर दुर्गुणांची काय गरज? (लोभ हाच सर्वात मोठा दुर्गुण आहे). जर चहाडी करण्याची वृत्ती असेल, तर इतर पापांची काय गरज? जर सत्य असेल, तर तपश्चर्येची काय गरज? जर मन शुद्ध असेल, तर तीर्थयात्रेची काय गरज? जर सौजन्य (सात्विकता) असेल, तर इतर गुणांची काय गरज? जर चांगली कीर्ती असेल, तर दागिन्यांची काय गरज? जर उत्तम विद्या असेल, तर धनाची काय गरज? आणि जर अपयश (अपकीर्ती) वाट्याला आली असेल, तर मृत्यूची काय गरज? (कारण अपकीर्ती ही मृत्यूहूनही भयानक आहे).

If there is greed, what is the need for other vices? If there is backbiting, what is the need for other sins? If there is truth, why perform penance? If the mind is pure, what is the use of a pilgrimage? If there is gentleness, what use are other virtues? If there is great fame, why wear ornaments? If there is true knowledge, why seek wealth? And if there is infamy, what need is there for death? (For infamy is worse than death).

त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं 
पुत्राश्च दाराश्च सुहृज्जनाश्च । 
तमर्थवन्तं पुनराश्रयन्ति 
ह्यर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः।। ३५२।।

माणसाचे धन संपले की मित्र, पुत्र, पत्नी आणि जवळचे नातेवाईक त्याला सोडून जातात. पण तोच माणूस पुन्हा धनवान झाला की ते सर्व पुन्हा त्याच्याकडे येतात. म्हणून, या जगात 'पैसा' हाच माणसाचा खरा नातेवाईक (बंधू) मानला जातो.

Friends, sons, wives, and relatives abandon a person who is devoid of wealth. But when that same person becomes wealthy again, they return to him. Indeed, in this world, wealth alone is a man’s true kinsman.

बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते
पिपासितैः काव्यरसो न पीयते।
न छन्दसा केनचिदुद्धृतं कुलं 
हिरण्यमेवार्जय निष्फला गुणा ।।३५३।।

भूक लागली असताना व्याकरण खाल्ले जात नाही (भूक व्याकरणाने भागत नाही), तहान लागली असताना काव्याचा रस पिता येत नाही. केवळ छंदशास्त्रामुळे कुळाचा उद्धार होत नाही. म्हणून, द्रव्य (धन) मिळवण्याचा प्रयत्न करा; धनाशिवाय इतर सर्व गुण निष्फळ ठरतात.

Grammar cannot be eaten by the hungry; the "juice" of poetry cannot be drunk by the thirsty. No one’s lineage is saved by mere knowledge of prosody (meter). Therefore, earn gold (wealth); without it, all other talents are fruitless.

वैद्याः वदन्ति कफपित्तमरुद्विकारान्
ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति ।
भूताभिषङ्ग इति भूतविदो वदन्ति
प्रारब्धकर्म बलवन्मुनयोः वदन्ति।।३५४।।

एखादे संकट आले की वैद्य म्हणतात 'हा कफ, पित्त किंवा वायूचा दोष आहे'. ज्योतिषी म्हणतात 'ग्रहांची चाल बदलली आहे'. भूतविद्या जाणणारे म्हणतात 'ही भुताची बाधा आहे'. परंतु, मुनी (ज्ञानी लोक) मात्र असे सांगतात की, हे सर्व आपल्या 'प्रारब्ध कर्माचा' (नशिबाचा) खेळ आहे आणि तेच सर्वात बलवान आहे.

When illness or trouble strikes, physicians blame the imbalance of phlegm, bile, or wind. Astrologers claim it is the shifting movement of the planets. Exorcists say it is the influence of spirits. But the wise sages declare that it is simply the power of one’s 'Prarabdha' (past destiny) at work.

संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते, 
तदेव मुक्ताकारतया नलिनी पत्रस्थितो राजते। 
स्वात्यां सागरशुक्तिसम्पुटगतौ तन्मौक्तिकं जायते, 
प्रायेणाधममध्यमोत्तमगुण: संसर्गतो जायते ।। ३५५।।

तप्त लोखंडावर पाण्याचा थेंब पडला तर त्याचे नावही उरत नाही (तो लगेच जळून जातो). तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकू लागतो. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रात समुद्रातील शिंपल्यात पडला, तर त्याचा खरोखरच मोती बनतो. अशा प्रकारे, माणसाचे अधम (नीच), मध्यम किंवा उत्तम गुण हे त्याच्या संगतीवरच अवलंबून असतात.

A drop of water falling on hot iron vanishes instantly, leaving no trace. The same drop, when resting on a lotus leaf, shines like a pearl. And if it falls into an oyster shell in the ocean during the Swati constellation, it actually becomes a pearl. Generally, the low, middle, or high qualities of a person are determined by the company they keep.

क्षते प्रहारा निपन्तत्यभीक्ष्णं 
धनक्षये वर्धते जाठराग्नि:।
आपत्सु मित्राणि परित्यजन्ति
छिद्रेष्वनर्था बहुलीभवंति ।।३५६।।

जिथे जखम झाली असते, तिथेच वारंवार प्रहार होतात. जेव्हा माणसाचे धन नष्ट होते, तेव्हाच त्याची भूक (जाठराग्नि) अधिक प्रबळ होते. संकटाच्या काळात मित्रही सोडून जातात. म्हणूनच म्हटले आहे की, जिथे दोष किंवा छिद्र (कमकुवतपणा) असते, तिथेच अनर्थांची मालिका वाढते.
English:
Blows often fall repeatedly on an already existing wound. When wealth is lost, the fire of hunger (appetite) increases. In times of trouble, friends often abandon you. Indeed, misfortunes multiply where there are already gaps or weaknesses.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः।
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त गज नलिनीमुज्जहार।।३५७।।

रात्र संपेल, सुंदर सकाळ होईल, सूर्य उगवेल आणि कमळाची शोभा पुन्हा फुलेल (कमळ उमलेल),"—कमळाच्या पाकळ्यांत अडकलेला भुंगा असा विचार करतच होता, तोच—'अरेरे, काय हे दुर्दैव!—एका हत्तीने ते कमळच मुळासकट उपटून टाकले! (चांगले घडणार या अपेक्षेने मनुष्य आशावादी होऊन बसला असताना दैवाचा आघात त्याची आशाच नष्ट करतो )

"The night will pass, a beautiful dawn will arrive, the sun will rise, and the lotus will bloom again in all its glory,"—while the bee, trapped inside the closed petals, was thinking thus, alas! A rogue elephant uprooted the entire lotus plant! ( The person who has hpoe for a better future -- his hpoe is destroyed suddenly by a sudden stroke of fate)

अव्याकरणमधीतं 
भिन्नद्रोण्या तरङ्गिणीतरणम्।
भेजमपथ्यसहितं 
त्रयमिदमकृतं वरं न कृतम्।।३५८।।

व्याकरणाशिवाय केलेले अध्ययन, फुटलेल्या नौकेने (होडीने) नदी ओलांडणे आणि पथ्य न पाळता घेतलेले औषध—या तीन गोष्टी न केलेल्याच बऱ्या; कारण त्या फायद्याऐवजी नुकसानच जास्त करतात.

Study without the knowledge of grammar, crossing a river in a broken boat, and taking medicine without following a proper diet—these three are better left undone than done.

शस्त्रैर्हतास्तु रिपवो न हता भवन्ति
प्रज्ञाहताश्च नितरां सुहता भवन्ति।
शस्त्रं निहन्ति पुरुषस्य शरीरमेकं
प्रज्ञा कुलं च विभवं च यशश्च हन्ति।।३५९।।

शस्त्राने मारलेले शत्रू खरोखर मेलेले नसतात (कारण त्यांचा विचार किंवा वंश उरतो), पण बुद्धीने पराभूत केलेले शत्रू पूर्णपणे नष्ट होतात. शस्त्र केवळ माणसाच्या शरीराचा नाश करते, परंतु बुद्धी (चातुर्य) त्याचे कूळ, वैभव आणि यश या सर्वांचा नाश करू शकते.

Enemies killed by weapons are not truly destroyed, but those defeated by intellect are completely vanquished. A weapon kills only the physical body of a person, but intellect can destroy one's entire lineage, wealth, and fame.

कुपात्रदानाच्च भवेद्दरिद्रो
दारिद्र्यदोषेण करोति पापम्।
पापप्रभावान्नरकं प्रयाति
पुनर्दरिद्रः पुनरेव पापी।।३६०।।

कुपात्राला (अयोग्य व्यक्तीला) दान दिल्यामुळे माणूस दरिद्री होतो. दारिद्र्याच्या दुःखामुळे तो पापाचे आचरण करतो. पापकर्म केल्यामुळे तो नरकात जातो आणि पुन्हा दरिद्री म्हणून जन्म घेऊन पुन्हा पापी बनतो. (हे एक दुष्टचक्र आहे).

By giving charity to the unworthy, one becomes poor. Due to the sting of poverty, one commits sins. Because of the influence of sin, one goes to hell and is born poor again, becoming a sinner once more.

.